भारतीय संघ वेस्ट इंडिज दाैऱ्यावर जाणार आहे. तिथल्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेसाठी राेहित शर्माला पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आला आहे. पण मुंबईतील इंडियन्समधील खेळाडूंची मात्र या संघात निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरूष निवड समितीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार हा भारतीय संघ निवडण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचे कसोटी आणि वनडे संघ यापूर्वी निवडण्यात आले होते. या दोन्ही संघांचे कर्णधारपद हे रोहित शर्माकडेच आहेत. या दौऱ्यात रोहित शर्मा टी-२० संघाचे नेतृत्व करेल, असे वाटत होते. पण सध्याला रोहितला बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० संघापासून लांब ठेवले आहे. आता या संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे असेल. यापूर्वी हार्दिकने काही मालिकांमध्ये भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केले आहे. पण त्याला हंगामी कर्णधार म्हटले जाते.
या संघाचे उपकर्णधार हे पद सूर्यकुमार यादवकडे असेल, त्याचबरोबर संघात इशान किशन आणि संजू सॅमसन असे दोन यष्टीरक्षक या संघात पाहायला मिळत आहे. यशस्वी जैस्वाल आणि मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माला संघात वर्णी लागली आहे. आगामी टी-२० विश्वचषक पाहता हा संघ निवडण्यात आले आहे, असे म्हटले जात आहे.
भारताचा संघ पुढीलप्रमाणे : इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.