Nagar News : नुकतेच मध्य रेल यांनी दौंड ते मनमाड हा विभाग सोलापूर विभाग ऐवजी पुणे विभागीत जोडला जाईल असे आदेश रेल्वे बोर्ड चे सचिव अरुणा नायर यांनी दिले. येते एक एप्रिल पासून हा 220 किलोमीटरचा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात समावेश करण्यात येणार आहे.
सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य बैठकीत समिती सदस्य प्रशांत मुनोत यांनी हा विषय मांडला होता. यापूर्वी देखील नगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने सदर विषय वेळोवेळी मानडण्यात आलेले आहे. खासदार सुजय विखे यांच्यासोबत देखील या विषयासंदर्भात चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले होते. आज पुणे हा नगर शहराच्या जवळ आहे आणि फक्त 120 किलोमीटर अंतरावर आहे, सोलापूर हा अहमदनगर पासून जवळपास तीनशे किलोमीटर लांब असल्याने गैरसोयीचं होतं. यापूर्वी आपले प्रश्न उपस्थित करण्याकरिता व सोडवण्याकरिता प्रवाशांना व प्रवासी संघटनांना सोलापूरला जावे लागायचे, असे मुनोत यांनी सांगितले.
एकूण 22 रेल्वे स्थानक दौंड ते मनमाडच्या दरम्यान पुणे विभागात जोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अनेक गैरसोयी टाळता येतील असे श्री वधवा यांनी नमूद केले. आत्ता या निर्णयामुळे अनेक फायदे होतील त्यात प्रमुख फायदा म्हणजे ग्रुप बुकिंग करिता सोलापूरला जाण्याऐवजी फक्त पुण्याला जावे लागेल. दुसरा अपंग तसेच कन्सेशन प्राप्त करण्याकरिता व्यक्तींना- प्रवाशांना सोलापूरला जायला लागायचे ते आता पुण्याला जाऊन शक्य होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनमाड ते लोणावळा एकच म्हणजे पुणे विभागात आले आले.
नगर-पुणे इंटरसिटी किंवा शिर्डी पुणे इंटरसिटी यास पुणे विभाग स्वतःहून इंट्रोड्युस करू शकते आणि ती देखील सुरू करावी. या निर्णयाकरिता नगर जिल्हा प्रवासी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता आणि या निर्णयाचे स्वागत वधवा, मुनोत, अरर्षद शेख, संजय चव्हाण, अशोक कानडे, विपुल शहा, सुनील छाजेड, संजय सपकाळ, संदेश रपारिया, अजय दिघे, संतोष बडे, संजय वाळुंज आदींनी केले आहे.