MPSC च्या पेपरफुटी प्रकरणावर आमदार राेहित पवार यांनी माेठा आराेप केला आहे. MPSC च्या पेपर फुटीत ज्यांवर गुन्हा दाखल आहे, त्या दाेघांचे नाव गुणवत्ता यादीत आले आहे. पावसाळी अधिवेशनात पेपर फुटीचा मुद्दा मांडला हाेता. पण त्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केले आणि पेपर फाेडणाऱ्या टाेळीची बाजू घेतली हाेती, असा गंभीर आराेपही आमदार राेहित पवार यांनी केला आहे.
आदरणीय फडणवीस साहेब, #पावसाळी_अधिवेशन सुरू असताना #पेपरफुटीचा मुद्दा मांडला असता आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा देऊन पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती.
आपल्या त्याच चुकीमुळं पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला… pic.twitter.com/fDRNpng2y3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2023
‘एक्स’ अकाउंटवर राेहित पवार म्हणाले, “आदरणीय फडणवीस साहेब, पावसाळी अधिवेशन सुरू असताना पेपर फुटीचा मुद्दा मांडला हाेता. पण, आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला हाेता. आणि पेपर फाेडणाऱ्या टाेळींची बाजू घेतली हाेती”. आपल्या त्याच चुकीमुळे पेपर फाेडणाऱ्या टाेळ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक परिक्षेत या टाेळ्या पेपर फाेडायला लागल्या. आता तर पेपर फाेडणाऱ्या टाेळ्यांच्या विराेधात गुन्हा दाखल हाेताच, मंत्रालयातून त्यांना साेडण्यासाठी फाेन जातात. आपल्या त्या एका चुकीचे परिणाम राज्यातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना भाेगावे लागत आहे, असेही राेहित पवार यांनी म्हटले आहे.
आता या पेपर फाेडणाऱ्या टाेळ्यांची हिंमत इतकी वाढलीय की, ते MPSC चे पेपर फाेडायला लागलेत. त्यांची नावे गुणवत्ता यादीतही यायला लागली आहेत. यासाठी MPSC चे पेपर फाेडणाऱ्या या टोळ्यांना जबाबदार धरायचे की, त्यांना अभय देणाऱ्या सरकारला?” असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे. शासनाने थाेडा गंभीरपणे विचार करावा. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या कळकळीची विनंती आहे की, राज्यस्थान, उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यातही पेपरफुटी विराेधात कडक कायदा आणा. जेणेवरून पेपर फाेडण्याची काेणाची हिंमत हाेणार नाही, असेही राेहित पवार यांनी म्हणाले आहेत.
प्रकरण नेमके काय
MPSC मार्फत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध अराजपत्रित गट ‘ब’ व गट‘क’ संवर्गातील पदभरतीकरीता 30 एप्रिल 2023 रोजी पूर्वपरीक्षा झाली. ही परीक्षा महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर झाली. परीक्षेला बसलेला जालना इथला उमेदवार आकाश भाऊसिंग घुनावत (वय 27) याने हडपसर (पुणे) इथल्या जेएसपीएम जयवंतराव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेट ‘बी’ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्पाय कॅमेऱ्याद्वारे जीवन नायमाने या व्यक्तीला पाठविली होती. त्यानंतर जीवन नायमाने याने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शंकर जारवाल याच्या मोबाईलवर पाठवली. या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. पण, नायमाने आणि घुनावतचे नाव गुणवत्ता यादीत आले आहे. याचा फोटोही रोहित पवार यांनी ‘एक्स’वर शेअर केला आहे.