Ahmednagar News ः “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत निळ्या झेंड्याशिवाय कोणताही झेंडा नको. आंबेडकर जयंती मिरवणुकीत इतर झेंडे आणि इतर घोषणा दिल्यामुळे जातीय ताणतणाव निर्माण झाला होता. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे या मिरवणुकीत निळ्या झेंड्याशिवाय कोणताही झेंडा नको”, अशा सूचना माजी नगरसेवक अजय साळवे यांनी केल्या. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीची बैठक दादासाहेब रुपवते विद्यालय येथे झाली.
अजय साळवे म्हणाले, “मिरवणुकीत जास्तीत जास्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे वाजवावेत. मिरवणुकीत निळ लावावी पण निळ उधळू नये. तसेच प्रत्येक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आभिवादन करूनच मिरवणुकीत सहभाग नोंदविने महत्वाचे आहे”. तसेच शक्य असल्यास महिलांसाठी होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम राबविले तर एक आदर्श जयंती होईल, असे त्यांनी सांगितले.
निलक्रांती चौक, सिद्धार्थनगर, सर्जेपुरा कौलारू, माळीवाडा, नागापूर, गांधीनगर, रेल्वे स्टेशन, मंगलगेट, डॉन बॉस्को, सावेडी, आंबेडकर चौक, बोल्हेगाव आदी भागातील कार्यकर्त्यांनी मिरवणुकीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
रोहित आव्हाड, अंकुश मोहिते, तुकाराम गायकवाड, महेश भोसले, विशाल गायकवाड, सुजित घनगाळे, निखिल साळवे, प्रतिक शिंदे, मृणाल भिंगारदिवे, आकाश गायकवाड, बबलू भिंगारदिवे, राहुल साळवे, श्रीकांत भोसले, प्रशांत भोसले, सुशांत शिरसाठ, शुभम जाधव, सोनू शिंदे, संदीप वाघचौरे, सागर साळवे, बाळासाहेब निकम, गौरव पाटोळे, गणेश डबाळे उपस्थित होते. प्रा. जयंत गायकवाड यांनी आभार मानले.