Dr. Ambedkar Jayanti ः “महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार आणि विचार हे समाज्यासाठी प्रेरित करणारे होते. त्यांच्या विचाराची आज प्रेरणा घेऊन आपलं जीवन कार्य सुरू केल्यास आजही सामाज्यात विकसित क्रांती घडून सक्षम आणि समृद्ध भारत घडू शकतो. असे झाल्यास खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जयंतीस अभिवादन होईल”, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगावतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने विविध ठिकाणी स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी अभिवादन करून जयंती साजरी केली.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, “कोपरगाव शहरातील बस स्थानकाच्या नुतनीकरणासाठी सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करत आज सुसज्ज, असे बस स्थानकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने अभिवादन करतांना मनस्वी आनंद होत आहे”. शंकररावजी कोल्हे यांच्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची नेहमी छाप दिसायची. त्यांनी सदैव डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करीत आंबेडकरी जनतेची नेहमीच सेवा केली आहे. त्यांच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी नेहमी तत्पर असायचे, असेही कोल्हे म्हणाल्या.
“सामाजिक ऐक्य आणि देशाला जगातील आदर्श घटना देणारे महामानव हे आपली ऊर्जा आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागळातील माणसाला सर्वोच आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणारे मूल्य जनमानसात रुजविले. अतिशय प्रगल्भ अभ्यास आणि दूरदृष्टी डॉ.आंबेडकर यांनी दाखविल्याने जगात भारत एक महत्वाचा देश म्हणून नावाजला गेला.कोल्हे परिवार आणि आंबेडकरी समाज यांचे अतूट असे ऋनानुबंध आहेत”, अशी भावना विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.
डी. आर. काले, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, जनार्दन कदम, शरद थोरात, गोपीनाथ गायकवाड, वैभव गिरमे, जयप्रकाश आव्हाड, अल्ताफ कुरेशी, सतिश रानोडे, हाशम शेख, अमोल गवळी, राजेंद्र पाटणकर, शरद शिंगाडे, गौतम खरात, आशिष कांबळे, आगार व्यवस्थापक अमोल बनकर, सहायक वरिष्ठ निरीक्षक अविनाश गायकवाड उपस्थित होते.
पोहेगावात युवा नेते विवेक कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी नितीनराव औताडे, बापूसाहेब औताडे, संजय औताडे, ज्ञानदेव औताडे, रमेश औताडे, अशोक औताडे, अप्पासाहेब औताडे, सुकदेव भालेराव, अमोल औताडे, निखिल औताडे, बाळासाहेब भालेराव उपस्थित होते.
जेऊर कुंभारी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उपस्थित भीम बांधव व ग्रामस्थांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देत संवाद साधला. भीमराज वक्ते, शांताराम रणशुर, दीपक गायकवाड, बाळासाहेब वक्ते, मधू वक्ते, बापूराव वक्ते, बिपीन गायकवाड, बाबुराव काकडे, सुधाकर वक्ते आदी उपस्थित होते.