मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गाैर, गणपती आणि दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, वस्ती, पाडे आता मुख्य रस्त्यांना जाेडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच नऊ महत्त्वाच्या निर्णयांना कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, वस्ती, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यात येणार. यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ राबविणार आहे. यासाठी पाच हजार काेटी रुपयांचा प्रस्ताव आहे.
गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय झाला. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा हा शिधा असणार आहे.
आयटीआयमधील शिल्प कारागिर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता दरमहा 500 रुपये मिळणार आहेत.
मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे.
केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यात राज्याचा हिस्सा वाढवण्यात आला आहे.
सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे घेण्याचा निर्णय झाला आहे.
दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतनाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.
मंडणगड येथे दिवाणी न्यायालयाला मंजुरी देण्यात आली आहे.