नगर : मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देत नाही. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत तरी त्यांची प्रकृती खुप खालवली आहे. आज पर्यंत मराठा समाजाच्या तरुणांने आत्महत्या केलेल्या आहेत. तरी त्या आत्महत्या करणाऱ्यांच बलीदान वाया जाऊ नये आणी मराठा समाजाला हक्काच आरक्षण मिळावं यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका कलम सप्रे यांनी राजीनामा दिला आहे.
सकल मराठा बांधवानी गेली 40 वर्षापासून आरक्षणासाठी लढा देत आहेत. राज्यकर्ते फक्त मराठ्यांचे राजकारणासाठी वापर करीत आहेत. राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी अजुन किती बळी हवे आहेत. आज समाजबांधवावर होणारा अन्याय सहन होत नसल्यामुळे मी ज्या समाजाने मला पदावर बसवले त्या समाजाच्या ऋण फेडण्यासाठी आणि भविष्यात समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे कमल सप्रे यांनी म्हटले आहे. समाजात राजकारण करत असताना सर्व जाती धर्माला एकत्र करून प्रत्येक जाति धर्माला कसा न्याय देता येईल याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाण असताना राजकारणी स्वतः फायद्यासाठी वापर करतात याचा निषेध म्हणुन आणि अहिल्यानगर व नागापूर-बोल्हेगांव परिसारातील जनतेला न्याय मिळावा म्हणून नैतिकतेने राजीनामा दिल्याचेही कमल सप्रे यांनी म्हटले.
पहिला पक्षाचा राजीनामा हा नागापुर-बोल्हेगांव परिसारातील विकासकामे होत नाही म्हणुन दिला होता, व आज नगरसेवक पदाचा राजीनामा हा मराठा समाज्याला आरक्षणासाठी देत आहे. जरी मी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असला तरी नागापूर-बोल्हेगांव व उपनगर परिसरातील नागरिकांच्या समस्या सुख-दुखा: साठी मी प्रामाणिक पणे काम कराणार , यापुढे मी माझे पती दत्तापाटील सप्रे समाजाच्या विकासासाठी सुख-दुःखासाठी बांधील आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा असून सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावे, असे कमल सप्रे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले. हे राजीनामा पत्र मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे सुपुर्द केला आहे.