Close Menu
Kharee GoshtKharee Gosht
    What's Hot

    Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

    May 4, 2024

    Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

    May 4, 2024

    Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

    May 4, 2024
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
    • Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
    • Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
    • Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
    • Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
    • Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
    • Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
    • Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
    Kharee GoshtKharee Gosht
    Monday, July 7
    • Home
    • खरी गोष्ट
    • ताज्या बातम्या
    • महाराष्ट्र
    • शैक्षणिक
    • अर्थ
    • मनोरंजन
    Kharee GoshtKharee Gosht
    Home»शैक्षणिक

    Mahatma Phule Agricultural University News ः भारतीय राज्यघटना सर्वसमावेशक आणि सर्व वैविध्यांचा सन्मान करणारी

    Kharee GoshtBy Kharee GoshtApril 14, 2024 शैक्षणिक No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook WhatsApp Twitter LinkedIn Pinterest Email

    Dr. Ambedkar Jayanti ः “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील जातींचे उच्चाटन करण्यासाठी खुप प्रयत्न केले. त्यासाठी जातीयंतांचा लढा देखील उभारला. आज भारतात सात हजारांपेक्षा जास्त जातींची नोंद आहे, अनेक धर्म आहेत तरीही आपला भारत देश एकसंघ आहे याचे सर्व श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. सर्व समावेशक आणि सर्व वैविध्यांचा सन्मान करणारी राज्यघटना ही जगातील अद्वितीय राज्यघटना आहे”, असे प्रतिपादन नाशिक येथील निवृत्त पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती यांनी केले.

    राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय अपरांती बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. कुलसचिव अरुण आनंदकर, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल अत्रे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी व कार्यक्रमाचे आयोजक डॉ. महावीरसिंग चौहान व अभियंता अभिजीत पाटील उपस्थित होते.

    डॉ. संजय अपरांती म्हणाले, “प्रशासनात जाणाऱ्यांनी मी जे काही करेल ते समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहचेल याचा विचार केला पाहिजे. मी आजपर्यंत जे काही शिकलो त्याची अंमलबजावणी कृतीत कशी करता येईल हे ठरवले पाहिजे”.

    डॉ. सुनील गोरंटीवार म्हणाले, “राज्यघटना लिहिण्याचे फार मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. याचबरोबर त्यांनी भुमीहिन मजूर व सघन शेती या शेतीविषयक धोरणात बदल सुचविले”. जास्त पूर येणाऱ्या प्रदेशातील शेती वाचविण्यासाठी धरणे बांधली पाहिजेत, असा दृष्टीकोन ठेवून दामोधरसारखे प्रकल्प बांधल्यामुळे उत्तर प्रदेश तसेच बिहार या राज्यांमधील पूर परिस्थिती आटोक्यात आली. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे भारतातील समाज एकसंघ राहण्यात मोठी मदत झाल्याचे डाॅ. गोरंटीवार यांनी सांगितले.

    कुलसचिव अरुण आनंदकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगाला पडलेले एक सुंदर स्वप्न होय. आपल्याकडे जे काही आहे ते लोकशाहीमुळे आहे. आपल्याला जर सन्मानीय नागरीक म्हणून जगायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच आपल्याला पुढे जावे लागेल, असे सांगितले.

    डॉ. महावीरसिंग चौहान यांनी प्रास्ताविक केले. दिव्या साठे हिने सूत्रसंचालन केले. डॉ. विजू अमोलिक यांनी आभार मानले.

    Share. Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kharee Gosht

      Keep Reading

      Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य

      Sport in Ahmednagar ः जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 300 खेळाडूंचा सहभाग

      New Arts College News ः प्राचार्य झावरे व प्रा. जावळे यांचा सेवापूर्ती गौरव

      Employment News ः रसायनशास्त्र विभागातील 20 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

      Rahuri News ः सावित्रीच्या लेकी क्रिकेटमध्ये राज्यात प्रथम

      Bhingar News ः पूजा वराडे व तुषार घाडगे यांचा गौरव

      Add A Comment
      Leave A Reply Cancel Reply

      Editors Picks

      Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

      May 4, 2024

      Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

      May 4, 2024

      Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

      May 4, 2024

      Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले

      May 4, 2024
      Latest Posts
      © 2025 Kharee Gosht
      • Privacy Policy
      • Terms
      • Accessibility

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.