भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीचे प्लॅनिंग जबरदस्त असते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची प्रत्येक निवडणूक ते प्लॅनिंग करून लढतात. लाेकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी अवघे चारशे दिवस राहिले आहेत. त्याचे प्लॅनिंग भाजपकडून पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भाजपच्या संसदीय कार्यकरिणीमध्ये खासदांना या निवडणुकीसंदर्भात खास कानमंत्र दिला आहे. निवडणुकीत विजय व्हायचे असेल, तर जनतेशी कनेक्ट रहा, तसे केल्यास अँटी इन्कबन्सी हाेणार नाही. खासदारांनी आपल्या मतदार संघांमध्ये लाेकांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजेत, असेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितले.
भाजपची संसदीय कार्यकारिणीची बैठक नुकताच झाली. या बैठकीत नरेंद्र माेदी वेगवेगळ्या विषयांवर खासदारांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, “अमृतकाळातला अर्थसंकल्पही सादर झाला आहे. हा अर्थसंकल्प सर्व घटकांना विचारात घेऊन सादर करण्यात आला आहे. यावर लाेक टीका करत आहेत. हा अर्थसंकल्प निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून सादर केला आहे, असं अजिबात नाही. यावर खासदारांनी आपल्या मतदारसंघात जावून लाेकांशी संवाद साधला पाहिजे. सामान्य माणसांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर केल्याचे खासदारांनी लाेकांना पटवून दिले पाहिजे”.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक